९.पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान। Paryavarniy Vyavsthapan 9vi

9 class science question answer Paryavarniy Vyavsthapan | इयत्ता नववी सामान्य विज्ञान पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे

 


प्रश्न 1. ‘अ’ व ‘ब’ स्तंभाची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा.

 

अ’ स्तंभ

ब’ स्तंभ उत्तरे

१. धोकादायक कचरा

इ. किरणोत्सारी पदार्थ

२. घरगुती कचरा

ई. वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली

३. जैववैद्यकीय कचरा

उ. बँडेज, कापूस, सुया इत्यादी

४. औद्योगिक कचरा

आ. रसायने, रंग, राख इत्यादी.

५. शहरी कचरा

अ. काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी

 

1. धोकादायक कचरा - किरणोत्सारी पदार्थ

किरणोत्सारी पदार्थांमुळे पेशी आणि डी.एन.ए. वर घातक परिणाम होतो. या जनुकीय बदलांमुळे पुढच्या पिढ्या विकृत होऊ शकतात. किरणोत्सारी पदार्थ पर्यावरणात साचून राहतात. त्यामुळे तेथील वनस्पती आणि प्राण्यांवर त्याचा परिणाम होतो.

 

2. घरगुती कचरा - वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या झाली.

प्रत्येक घराघरांत विविध प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. यात वाया गेलेले अन्न, फळांच्या साली, भाज्यांची देठे वगैरे टाकाऊ पदार्थ निर्माणहोतात. हा कचरा कुठेही आणि कसाही फेकल्यास दुर्गंधी येते. हा सर्व कचरा विघटनशील असल्यामुळे त्याच्यापासून जीवाणूंच्या मदतीने निसर्गतःच असेंद्रीय पदार्थ निर्माण होत असतात. परंतु हे विघटन होत असताना माशा, बुरशी आणि इतर अनारोग्यकारक सूक्ष्मजीव त्यावर वाढू शकतात. म्हणून अशा कचऱ्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावून त्यापासून मौल्यवान खत बनवले पाहिजे.अन्यथा निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरल्या जातील. त्याव्यतिरिक्त परिसर गलिच्छ आणि अनारोग्यकारक बनेल.

 

3. जैववैद्यकीय कचरा-बँडेज, कापूस, सुया इत्यादी.

जैववैद्यकीय कचरा अतिशय काळजीपूर्वक टाकला पाहिजे. याचे स्त्रोताच्या ठिकाणीच ज्वलन करणे आवश्यक असते. जैववैद्यकीय कचऱ्यात रक्त, पू आणि इतर जैविक प्रकारचा उत्सर्जित कजरा असतो. हे सर्व अतिशय घातक ठरू शकतात. कचऱ्यातल्या सुयांचा गैरवापर होऊ शकतो. व्यसनाधीन लोकांकडून असा वापर होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे एड्स आणि हेपाटीटीस बी सारख्या रोगांचा प्रसार होतो. असा कचरा दिसायला अतिशय गलिच्छ असतोच पण त्याहून घातक म्हणजे तो रोगांचा प्रसार करू शकतो. म्हणून इतरांचे आरोग्य वाचवण्यासाठी जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या करावे लागते.

 

4. औद्योगिक कचरा-रसायने, रंग, राख इत्यादी.

औद्योगिक विकासाचा एक परिणाम म्हणजे औद्योगिक प्रदूषितांमुळे होणारे जल आणि वायू प्रदूषण. कारखान्यांत होणाऱ्या विविध प्रक्रियांमुळे विषारी आणि घातक रसायने निर्माण होतात. हे पदार्थ परिसरात साचून राहतात. त्याचा परिणाम तेथील स्थानिक प्राणी आणि वनस्पतींवर होतो.

 

5. शहरी कचरा- काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी.

शहरात राहणारे लोक प्लॅस्टिक आणि रबर यांपासून बनवलेल्या वस्तूंचा खूपदा वापर करतात. कोणतीही टाकाऊ वस्तू कोठेही फेकण्याच्या प्रवृत्तीमुळे कॅरीबॅग, काचा आणि इतर अनेक गोष्टी इतरत्र टाकल्या जातात. शहरी लोकांत जबाबदारीची आणि सुजाण नागरिकत्वाची भावना कमी होत चालली आहे. त्यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरत चालले आहे.

 

स्वाध्याय पर्यावरणीय व्यवस्थापन  स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान  पर्यावरणीय व्यवस्थापन इयत्ता नववी स्वाध्याय pdf  इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय


प्रश्न 2. दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने  पूर्ण करून त्यांचे समर्थन करा.

(भौगोलिक अनुकूलता, हवामान, हवा, वेधशाळा)

 

अ. जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक...... हा आहे.

उत्तर : जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक भौगोलिक अनुकूलता हा आहे.

भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्या-त्या प्रदेशात वनस्पती व प्राणी तग धरू शकतात. म्हणून जैवविविधता भौगोलिक अनुकूलतेवरच अवलंबून असते

 


आ. कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या  वातावरणाच्या स्थितीचे वर्णन.......होय.

उत्तर : कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या  वातावरणाच्या स्थितीचे वर्णन हवा होय.

अल्पकाळ असणारी वातावरणाची स्थिती म्हणजेच त्यावेळची आणि त्या ठिकाणची हवा होय.

 

इ. मानवाने कितीही प्रगती केली तरी.........चा विचार करावाच लागतो.

उत्तर : मानवाने कितीही प्रगती केली तरी हवामान चा विचार करावाच लागतो.

हवामानाच्या घटकावर दैनंदिन जीवन अवलंबून असते. हवामान बदलाच्या संकटामुळे नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत. आरोग्य, पाणीपुरवठा, अन्नउत्पादन आणि बांधकामे असे सर्व घटक नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडते. हे हवामान बदलामुळे होत आहे. म्हणूनच मानवाने कितीही प्रगती केली तरी मानवाला हवामानाचा विचार करावाच लागतो.

 

ई. हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना.........असे म्हणतात.

उत्तर : हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना वेधशाळा असे म्हणतात.

वेधशाळा याठिकाणी हवामान शास्त्रातील संशोधन केलेले ज्ञान नोंदीच्या स्वरूपात असते तसेच निरनिराळ्या तंत्र व यंत्रांचा समावेश असतो.

 

प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

 

अ. आपत्‍तीमध्‍ये जखमी झालेल्‍या आपदग्रस्‍तांना प्रथमोपचार कसा करावा?

उत्तर :

आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपद्ग्रस्तांचा जीव जाऊ नये यासाठी वैद्यकीय मदत मिळण्याअगोदर प्रथमोपचार केले जातात. यात तीन महत्त्वाचे उपाय आहेत. या उपायांनी प्राणहानी रोखता येते. याला प्रथमोपचाराचे ABC किंवा प्रथमोपचाराची मूलतत्त्वे असे म्हणतात.

A. श्वसनमार्ग : आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर

श्वासनलिका खुली राहील असे पाहावे. यासाठी डोके उतरते करावे

किंवा हनुवटी वर उचलावी.

B. श्वासोच्छवास : जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपल्या तोंडातून आपदग्रस्ताच्या तोंडामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा.

C. रक्ताभिसरण : बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आपदग्रस्त व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. नंतर हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे ही क्रिया करावी. ही पद्धत CPR म्हणून ओळखली जाते. रक्ताभिसरण परत सुरळीतपणे सुरू होण्यासाठी CPR चा उपयोग होतो.

रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल म्हणजेच अस्थिभंग झाला असेल तर हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करून रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवावे.

 

आ. शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा.

उत्तर :

            घनकचऱ्याचे वर्गीकरण व विभाजन, सेंद्रिय खतनिर्मिती अथवा कंपोस्टिंग, गांडूळ खतनिर्मिती, सुरक्षित भूमीभरण स्थळे आणि पायरोलिसिस या शास्त्रीय आणि पर्यावरणस्नेही पद्धतींनी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करता येते.

 

आ. शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा.


1) कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण:

ही प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापनाची प्राथमिक पायरी आहे. ओला व सुका कचरा म्हणजेच विघटनशील व अविघटनशील कचरा वेगळा करणे. घरोघरी जाऊन तो गोळा करणे हे सर्वप्रथम करावे लागते.

2) कंपोस्टिंग :

घरात तयार होणाऱ्या विघटनशील कचऱ्याचे घराभोवतीच्याच जागेत किंवा गच्चीत अथवा बागेत कंपोस्टिंग करून त्यापासून सेंद्रिय खत बनवता येते. घरातील उरलेसुरले खरकटे, अन्न, फळे, भाज्या यांच्या साली व टाकाऊ भाग, बागेतील कचरा, पूजेची फुले इत्यादी कंपोस्टिंगच्या पद्धतीने कुजवल्यास त्यापासून चांगले सेंद्रिय खत मिळते.

3) गांडूळ खत निर्मिती :

 घनकचऱ्याचे जलद विघटन करण्यासाठी गांडूळांचा वापर करतात. गांडूळांनी घनकचऱ्याचे विघटन करून तयार केलेली खते उच्च प्रतीच्या पोषकद्रव्यांनी समृद्ध असतात. परसबाग किंवा शेतीसाठी ती उपयुक्त असतात.

4) सुरक्षित भूमिभरण स्थळे :

भूमिभरण प्रक्रियेमध्ये गोळा केलेला कचरा जमिनीखाली गाडण्यात येतो. पाणवठ्यापासून 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील जागा सुरक्षित भूमिभरण स्थळासाठी निवडल्या जातात. तसेच मानवी वसाहती आणि महामार्गापासून देखील ती स्थळे दूर असावी लागतात. वर्गीकरण केल्यानंतर तो सुरक्षित भूमिभरण स्थळात दडपण्यापूर्वी त्या खड्ड्यात माती व प्लॅस्टिकचे अस्तर घालतात. अशी काळजी घेतल्याने जमीन व पाण्याचे प्रदूषण टाळता येते. औद्योगिक घनकचराही याच प्रमाणे गाडावा लागतो.

5) पायरोलिसिस :

या पद्धतीत कच्याचे उच्च तापमानाला ज्वलन केले जाते. वायू व वीजनिर्मितीसाठी ही प्रक्रिया करण्यात येते. शक्यतो अर्धवट ज्वलनशील पदार्थ या पद्धतीने जाळून नष्ट करता येतात. महानगरपालिकेद्वारा करण्यात येणाऱ्या कचरा व्यवस्थापनात पायरोलिसिस हे तंत्र वापरण्यात येते.

6) जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन :

या पद्धतीचा कचरा संसर्गजन्य असल्यामुळे तो भट्टीमध्ये उच्च तापमानाला जाळतात.

 

इ. हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :

१) वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचे  अंदाज बांधता येतात.

२) ज्यावेळी मोठ्या स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा जीवित आणि संपत्ती यांचे खूप मोठे नुकसान होते. गुरे-ढोरे मरण पावतात. लोकांची घरे कोसळून ते बेघर होतात.

३) यावर उपाय म्हणून आपत्ती येण्याच्या आधीच तेथील स्थानिक जनतेला तेथून हलवले जाते.

४) याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2013 साली 'फालीन' हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर येणार असे भारतीय वेधशाळेचे भाकीत होते. 4 ऑक्टोबर 2013 या दिवशी थायलंडच्या जवळपास कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकून ओडिशाच्या किनाऱ्यावर आपटेल याची खात्री झाल्यावर सरकारी यंत्रणांनी किनारपट्टीवर राहणाऱ्या पाच लाख लोकांना पुढच्या तीन-चार दिवसांत तेथून सुरक्षित जागी हलवले. खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी अशा व्यवस्थेने टाळता आली.

५) अतिवृष्टी, वादळ, चक्रीवादळ, भूकंप, त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर अगोदरच शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जनतेला सतर्क करतो.

६) मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार असेल तर लोकांना महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आणि पोलीस मुख्यालयातून मोबाईलवर संदेश पाठवले जातात.

 

ई. ई-कचरा घातक का आहे? याबाबत तुमचे मत लिहा.   

उत्तर :

१) ई-कचरा हा टाकाऊ व नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे निर्माण होतो.

२) दूरदर्शन संच, मोबाईल फोन्स, संगणक, म्युझिक सिस्टिम अशा अनेक उपक्रमांची विल्हेवाट लावणे ही एक फार मोठी समस्या झालेली आहे.

३) ई-कचरा धोकादायक असतो; कारण त्यात घातक रासायनिक संयुगे असतात. शिसे, पारा, कॅडमियम यासारखे जड धातू देखील ई-कचऱ्यात असतात. हे जड धातू अविघटनशील असल्यामुळे पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतात. मातीतील विघटनकारी सूक्ष्मजंतूवर ई-कचऱ्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होतो.

४) ई-कचरा मानवाच्या आरोग्यासाठी देखील घातक आहे. ई-कचऱ्याचे ज्वलन किंवा भूमिभरण केल्यास तेही हानिकारक ठरते. या सर्व कारणांमुळे ई-कचरा घातक ठरतो.

 

उ. घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल?

उत्तर :

१) घरात जमा झालेल्या कचऱ्यापैकी ओला कचरा व सुका कचरा मी वेगवेगळ्या कचरा पेटीत जमा करेन.

२) ओला कचरा शेतात किंवा बागेत नेऊन एका कोपऱ्यात खड्डा खणून विघटनासाठी ठेवीन.

३) सुक्या कचऱ्यात कोणकोणते घटक आहेत ते तपासून त्याप्रमाणे त्यांचे नियोजन करेन.

४) पेपरची रद्दी व इतर काही वस्तू रद्दीवाल्याला किंवा भंगारवाल्याला विकेन. ५) कचरा कमी करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तीन R तत्वांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेन .

 

पर्यावरणीय व्यवस्थापन प्रश्न उत्तरे | पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय


प्रश्न 4. टीपा लिहा.

हवामानशास्त्र, हवामानाचे घटक, मान्सून प्रारूप, औद्योगिक कचरा,प्लॅस्टिककचरा, प्रथमोपचाराची मूलतत्त्वे

उत्तर :

 

१) हवामानशास्त्र

            हवामानशास्त्र हे हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र आहे. याच्या अंतर्गत तापमान, हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. काही वर्षांच्या माहितीचे जतन केलेले असते. जुन्या आणि वर्तमानातल्या माहितीवरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. या अंदाजांचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, मानवसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो. या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक हवामानशास्त्र संघटना काम करते. तर राष्ट्रीय पातळीवर भारतीय हवामान खाते हवामान विषयक संशोधन करीत असते.

 

२) हवामानाचे घटक

            वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता, तापमान इत्यादी काही हवामानाचे विविध घटक आहेत. हे सर्व घटक वातावरणाची तत्कालीन स्थिती ठरवतात. एखाद्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीवर देखील हे घटक अवलंबून असतात. हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप केले जाते व त्यावरून त्या प्रदेशाचे हवामान ठरवले जाते.

 

३) मान्सून प्रारूप

            डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या अभ्यासगटाने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवले आहे. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप भारतात वापरले गेले. या प्रारूपामुळे मान्सूनचा नेमका अंदाज येतो. मान्सून प्रारूपाचे खालीलप्रमाणे तीन प्रकार आहेत.

1) संख्यात्मक प्रारूप

हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेतला जातो आणि त्यावरून संख्यात्मक रूपांद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो.

2) समुच्चित प्रारूप

अनेक रूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर जास्त प्रभाव आहे, अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येतो.

3) सांख्यिकी प्रारूप

विविध प्रदेशांत समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होता या सर्व बाबींचा एकत्रित अभ्यास केला जातो. त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत ते पाहिले जाते. याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल असा अंदाज प्रारूपात लावला जातो.

 

४) औद्योगिक कचरा

            कारखाने आणि विविध उद्योगांतून निर्माण होणारे नको असलेले पदार्थ म्हणजेच औद्योगिक कचरा होय. यात रसायने, रंग, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ, धातू इत्यादी मोठ्या प्रमाणात आढळतात. यातले बहुतेक पदार्थ विषारी असू शकतात. त्यांनी हवा, जल आणि जमिनीचे प्रदूषण होते. औद्योगिक घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा पशुपक्षी आणि मानवी आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा कचरा अविघटनशील असल्याने त्याचा परिसरात समुच्चय होतो.

 

५) औद्योगिक कचरा

            कारखाने आणि विविध उद्योगांतून निर्माण होणारे नको असलेले पदार्थ म्हणजेच औद्योगिक कचरा होय. यात रसायने, रंग, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ, धातू इत्यादी मोठ्या प्रमाणात आढळतात. यातले बहुतेक पदार्थ विषारी असू शकतात. त्यांनी हवा, जल आणि जमिनीचे प्रदूषण होते. औद्योगिक घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा पशुपक्षी आणि मानवी आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा कचरा अविघटनशील असल्याने त्याचा परिसरात समुच्चय होतो.

 

६) प्लॅस्टिक कचरा

            प्लॅस्टिक कचरा हा मूलतः घरगुती कचऱ्यातून खूप जास्त प्रमाणात सर्वदूर पसरला जातो. प्लॅस्टिक हे अविघटनशील असल्याने हजारो वर्षे पर्यावरणात ते तसेच पडून राहते. प्लेस्टिकचा कचरा जाळल्यास त्यातून विषारी वायूंची निर्मिती होते. प्लॅस्टिकच्या भक्षणाने गुरे मरतात, जलचरांनाही तरंगत्या प्लॅस्टिकने धोका पोहोचतो. प्लॅस्टिक कचरा निर्माण करणारा फक्त मानव, मात्र त्याचे दुष्परिणाम भोगणारी पूर्ण परिसंस्था. याचा विचार करून प्लॅस्टिकच्या अतिवापरावर अंकूश आला पाहिजे आणि या कचऱ्याचे  योग्य व्यवस्थापन झाले पाहिजे.

 

७) प्रथमोपचाराची मूलतत्वे

            आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपद्ग्रस्तांचा जीव जाऊ नये यासाठी वैद्यकीय मदत मिळण्याअगोदर प्रथमोपचार केले जातात. यात तीन महत्त्वाचे उपाय आहेत. या उपायांनी प्राणहानी रोखता येते. याला प्रथमोपचाराचे ABC किंवा प्रथमोपचाराची मूलतत्त्वे असे म्हणतात.

A. श्वसनमार्ग : आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर

श्वासनलिका खुली राहील असे पाहावे. यासाठी डोके उतरते करावे

किंवा हनुवटी वर उचलावी.

B. श्वासोच्छवास : जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपल्या तोंडातून आपदग्रस्ताच्या तोंडामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा.

C. रक्ताभिसरण : बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आपदग्रस्त व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. नंतर हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे ही क्रिया करावी. ही पद्धत CPR म्हणून ओळखली जाते. रक्ताभिसरण परत सुरळीतपणे सुरू होण्यासाठी CPR चा उपयोग होतो.

रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल म्हणजेच अस्थिभंग झाला असेल तर हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करून रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवावे.

 

प्रश्न 5. हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह  तुमच्या शब्दात लिहा.

उत्तर :

हवामानाचे सजीवसृष्टीतील महत्व खालीलप्रमाणे आहे.

1. दैनंदिन हवेचा आणि दीर्घकालीन हवामानाचा संपूर्ण परिसंस्थेवर आणि मानवी जीवनपद्धतीवर प्रभाव पडत असतो.

2. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी आणि वनस्पती तेथील स्थानिक हवामानानुसारच ठरतात.

3. एखाद्या प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जगण्याच्या पद्धती तेथिल स्थानिक हवामानाप्रमाणे असते. म्हणून थंड प्रदेश काश्मीरमधील आणि उष्ण प्रदेश राजस्थानमधील लोकांचा आहार आणि राहणीमान निरनिराळे असते.

3. एखाद्या प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जगण्याच्या पद्धती तेथिल स्थानिक हवामानाप्रमाणे असते. म्हणून थंड प्रदेश काश्मीरमधील आणि उष्ण प्रदेश राजस्थानमधील लोकांचा आहार आणि राहणीमान निरनिराळे असते.

4. समुद्राच्या पाण्याची क्षारता, सागर प्रवाहांची व जलचक्राची निर्मिती अशा सर्व बाबी हवा व हवामानावरच अवलंबून असतात.


Swadhyay Paryavarniy Vyavsthapan
Paryavarniy Vyavsthapan Swadhyay Prashn Uttare


6. रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.

            रुग्णांचे वहन करण्याच्या विविध पद्धती आहेत. कोणत्या प्रकारे रुग्ण आजारी आहे किंवा त्याला कोणती इजा झाली आहे यावर ठराविक पद्धत वापरली जाते. पाळणा पद्धत, पाठुंगळीला मारणे, मानवी कुबडी पद्धत, खेचून नेणे किंवा उचलून नेणे, चार हातांची बैठक, दोन हातांची बैठक, स्टेचरचा वापर या निरनिराळ्या पद्धती आहेत.

उदा. एखाद्या व्यक्तीचा अपघातामुळे एक पाय जायबंदी झाला असेल तर त्याच्या दुसऱ्या पायावर त्याला थोडा भार देऊन चालायला सांगावे. असे करताना आपण त्याला कुबडीप्रमाणे आधार द्यावा. यालाच मानवी कुबडी पद्धत असे म्हटले जाते. अपघातग्रस्त व्यक्ती आपले हात वापरू शकत नसेल तर दोनजणांनी दोन हातांची बैठक या पद्धतीने अशा रुग्णाला वाहून न्यावे. रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते तेव्हा याच दोनजणांना चार हातांची बैठक हा उपाय वापरता येतो.

या सर्व पद्धती वापरताना अपघातग्रस्त रुग्णाला कमीत कमी त्रास होईल हे पाहिले पाहिजे, त्याच्या दुखावलेल्या अवयवांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. रुग्णाला आराम पडेल, धीर येईल अशा रीतीने आपण वागले पाहिजे.


 

प्रश्न 7. फरक स्पष्ट करा.

 

अ. हवा व हवामान

उत्तर :

हवा

हवामान

१. वातावरणाच्या तत्कालीन अस्थायी परिस्थितीला हवा म्हणतात.

 

१. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात.

 

२. हवेत अल्पकाळात बदल होतो.

 

२. हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो.

३. एका प्रदेशातही हवेत सातत्य नसते.

 

३. हवामान एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते.

४. हवा सतत बदलत असते.

४. हवामान सतत बदलत नाही.

५. हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो.

५. हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो.

 


आ. विघटनशील व अविघटनशील कचरा.

उत्तर :


विघटनशील कचरा.

अविघटनशील कचरा.

१. ज्या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते, त्याला विघटनशील कचरा असे म्हणतात.

 

१. अविघटनशील कचरा ज्या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत होत नाही त्याला अविघटनशील कचरा असे म्हणतात.

२. या प्रकारच्या कचऱ्याला ओला घनकचरा असे म्हणतात.

२. या प्रकारच्या कचऱ्याला सुका घनकचरा असे म्हणतात.

३. अशा प्रकारचा कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साठवून राहत नाही.

३. अशा प्रकारचा कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साठून राहतो.

४. या कचऱ्यापासून विघटन होऊन सजीवांचे असेंद्रिय पदार्थ निसर्गात परत येतात.

४. या कचऱ्यापासून नैसर्गिक विघटन होत नाही. परंतु पुनर्चक्रीकरण केल्यास यातील काही पदार्थ पुन्हा वापरता येतात.

 

 *********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.